महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा भीषण सामना (Farmer Suicides)

Farmer Suicides:महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांच्या समस्येला काही वर्षांपासून सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षभरात राज्यात 2,706 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे,

ज्यामुळे दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 1,069 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे,

वाळू चोरीचा धंदा जोरात; प्रशासनाची कारवाई कुठे? (revenue)

तर छत्रपती संभाजीनगर विभागात 952 आत्महत्या झाल्या आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागाने विधानपरिषदेत यासंदर्भात लेखी माहिती दिली आहे.

**शेतकरी आत्महत्यांची मुख्य कारणे**

शेतकरी आत्महत्यांमागील मुख्य कारणे म्हणजे हवामान बदल, कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि सरकारच्या धोरणांचा अभाव.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागे ही संकटांची मालिका काही संपत नाहीये.

शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद सरकारकडून केली जात असली तरी,

Farmer Suicides: हा निधी खरोखर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो का याचा शोध घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here