
नागपूर शहरात सोमवारी रात्री भीषण हिंसाचाराची घटना घडली, ज्यामध्ये पथराव, वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड झाली. ही हिंसा औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर सुरू झाली.
दोन गटांमध्ये टकराव झाला, ज्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले. नागपूरच्या महल परिसरात ही हिंसा सुरू झाली आणि त्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या हिंसाचारावरून महाराष्ट्रातील एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले.
ते म्हणाले, “महाराष्ट्रातील एक विषारी मंत्री समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे,
हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे.” प्रकाश आंबेडकरांनी नागरिकांना अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा, असे आवाहन केले.
एकनाथ शिंदे यांनीही या हिंसाचारावरून भाष्य केले. ते म्हणाले, “नागपूर हे शांतता प्रिय शहर आहे. दोन समाजात तेढ निर्माण केली जात आहे.
https://x.com/SuryaMarathi/status/1901843732942491836?t=5MQy6RAykT28KqAeeZZbBQ&s=19
Prakashambedkar :पोलीस मूळाशी जाऊन तपास करतील. आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि शांतता राखावी.” या हिंसाचारामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आणि शहरातील काही भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.